समृद्धी महामार्गावर ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम लावणार – देवेन्द्र फडणवीस

0

मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क
समृद्धी महामार्गावर गेल्या अनेक दिवसांपासून अपघात मोठ्या प्रमाणावर घडत आहे . समृद्धी महामार्गावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम लावणार असल्याची माहिती दिली. बुलढाणा जिल्ह्यात अलीकडे झालेल्या अपघातामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या एका कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला. त्यात सख्ख्या बहिणी, त्यांची नात, मुलगा, दोन्ही सुना यांचा समावेश होता. या अपघाताचा मुद्दा विधानसभेत गाजला. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही समृद्धी महामार्गावरील अपघातचा मुद्दा गांभीर्याने घेण्याची मागणी केली. नेहमी काही ठिकाणी अपघात का होतात, याची तपासणी करण्याची मागणी केली. तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम लावणार असल्याची माहिती दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.