मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क:
काल झालेल्या मोठ्या राजकीय भूकंपामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. रविवारी राजभवनात 9 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आणि राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्याचे दिसत आहे. यानंतर राज्यभरातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते यांच्यात फूट पडली आहे. याच सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर डॉ. अमोल कोल्हे यांचं ट्विट सध्या चर्चेत आलं आहे. त्यांनी भावुक ट्विट करत कॅप्शन दिलं आणि मी साहेबांसोबतच असंही त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला सांगितलं आहे.
जब दिल और दिमाग में जंग हो तो दिल की सुनो। शायद दिमाग कभी कभी नैतिकता भूल जाता है … पर दिल कभी नहीं।#मी_साहेबांसोबत @NCPspeaks @PawarSpeaks @Jayant_R_Patil @supriya_sule @Awhadspeaks @TV9Marathi @SakalMediaNews @abpmajhatv @mataonline @SaamanaOnline @SarkarnamaNews @thodkyaat… pic.twitter.com/2kAhkkfnjd
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) July 3, 2023
रविवारी राजभवनात झालेल्या शपथविधी सोहळ्याला डॉ. अमोल कोल्हे उपस्थित होते. त्यावेळी सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र आता त्यांनी अजित पवारांनाच मोठा धक्का दिला आहे. त्यांनी मी पवारसाहेबांसोबतच म्हणत ट्विट केलं आहे. त्याबरोबरच या शपथविधीला राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील, शशिकांत शिंदे आणि जुन्नरचे आमदार अतुल बेनके हे देखील उपस्थित होते. मात्र आज हे तीनही आमदार शरद पवार यांच्यासोबत दिसून येत आहेत.
डॉ. अमोल कोळे म्हणाले कि, साहेब सांगतील ते धोरण आणि साहेब बांधतील ते धोरण. सगळं विसरायचं पण बाप नाही विसरायचा. त्याला नाही विसरायचं असं म्हणत अमोल कोल्हेंनी ट्विट केलं. जेव्हा बुद्धी आणि अंतःकरणात द्वंद्व होतं तेव्हा आपल्या मनाचं ऐका. कदाचित बुद्धी कधी कधी नैतिकता विसरते… पण मन कधीच विसरत नाही असं त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. त्यांच्या या ट्विटची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे.