अमळनेर ;- शहरातील आरके नगर भागात राहणाऱ्या एका १३ वर्षीय मुलाला २६ जून रोजी शाळेतून अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची तक्रार पालकांनी केल्यानंतर अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी कि, आरके नगर भागात राहणारे शिक्षकी पेशा असणारे यांचा मुलगा ऋग्वेद वय १३ याला शिक्षणासाठी आपल्याला घरापासून दूर जावे लागणार या भीती आणि दडपणामुळे तो घर सोडून गेल्याचा संशय पालकांना आहे . मात्र ऋग्वेद हा २६ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास फिर्यादी बाळासाहेब बोरसे हे शाळेत असताना त्यांना त्यांच्या पत्नी यांनी फोनवरून सांगितले कि, मी = शाळेत सकाळी ११ वाजेच्या सुमारास असताना याचा फोन आला होता. त्याने मला कटिंग करण्यासाठी जात असल्याचे सांगितले. मला उशीर झाला तर तुझ्याकडे घराची चावी आहे का अशी विचारणा केली होती. मात्र या घरी आल्या असता ऋग्वेद हा दिसून आला नाही त्याला कुणीतरी अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची फिर्याद दिल्यावरून अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक भैय्यासाहेब देशमुख करीत आहे.