लोकशाही न्यूज नेटवर्क
बऱ्याच दिवसांपासून अजित पवार (Ajit Pawar) मुख्यमंत्री होणार असल्याचं वृत्त समोर येत आहे. आणि त्यातच असा दादा करण्यात येत आहे कि दिल्लीहून याचे सूत्र हलविले जात आहे. तर जसे हे राज्य व्हावं अशी श्रींची ईच्छा होती तशीच या राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार व्हावेत अशी कार्यकर्ते म्हणून सर्वांची भावना असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी म्हटलं आहे.
तर एकंदरीत प्रशासनावर पकड असणारा, अभ्यासू व्यक्तीमत्व हे राज्याचं मुख्यमंत्री पदावर असावं असं प्रत्येकाला वाटतं. तशीच आपली भावना आहे. त्यातूनच धाराशीव, नागपूर येथे त्यांचे बँनर लागले. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्वत: बँनर हटवण्याच्या सुचना दिल्या. त्यामुळे अजित पवार यांच्यासारखा तोलामोलाचा नेता महाराष्ट्राचा राजकारण सांभाळेल असा सध्या तरी महाराष्ट्रात कोणी नाही. हे दस्तुरखुद्द अमित शहा यांनी कबूल केल आहे. त्यामुळे अजित पवार हे मुख्यमंत्री होणार, वेट अँड वॉच. दिल्लीतून सूत्र हलली आहेत. असं सध्याच्या काळात म्हंटल जात आहे.