मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क:
बदलापूराजवळील कोंडेश्वरमधून धबधब्यात बुडून 4 तरुणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. पावसाळ्यात प्रवेशास बंदी असते. आतापर्यंत अनेकवेळा तेथे झालेल्या अपघातांमुळे सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांना तेथे जाण्यापासून मज्जाव केला जातो. मात्र तरीही अनेकजण नियम मोडून तेथे जात असल्याचं उघड झालं आहे.
दरम्यान बदलापुर-कोंडेश्वर धबधब्यात बुडून 4 तरुणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. हे चौघेजण कोंडेश्वर येथे वाढदिवस साजरा करण्यासाठी घाटकोपर वरून आले होते. पावसाळ्यात धबधब्यावर मनाई असतानाही हे तरुण इथे कसे आले याबाबत सवाल प्रश्न आहे. दरम्यान स्थानिक गावकऱ्यांनी मृतदेह बाहेर काढले आहेत. धक्कादायक म्हणजे हे चौघेजणं अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे.