‘या ‘कारणामुळे दहावीच्या विद्याथीनीने उचलले टोकाचे पाऊल .. !

0

 

जयपूर ;- शिक्षण नगरी म्हणून ओळखले जाणाऱ्या राजस्थानच्या कोटा परिसरात अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने त्याच्या खोलीत गळफास घेत आत्महत्या केली आहे. कृपांगी असं या तरुणीचे नाव आहे. घटनेच्या दिवशी तिची आजी तिच्याशी बोलण्यासाठी गेली असता तिने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. कृपांगीच्या आत्महत्येने एकच खळबळ उडाली आहे.

यावेळी पोलिसांना कोणतीही सुसाइट नोट सापडली नाहीये. मात्र, फोन न दिल्याच्या कारणावरुन विद्यार्थिनी इतकं टोकाचं पाऊल उचलेल याची कोणालाच कल्पना नव्हती. कृपांगीच्या आत्महत्येने सर्वांना एकच धक्का बसला आहे. तर, तिच्या वडिलांवर दुखःचा डोंगर कोसळला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.