भारतीय संघ विश्वचषक अंतिम सामन्यात हरल्याचे कारण राहुल गांधींनी सांगितले; राजकारण तापले…

0

 

राजस्थान, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

भारतीय संघ विश्वचषक अंतिम सामन्यात हरल्याचे खापर राहुल गांधींनी भर सभेत एका व्यक्तीवर फोडले आहे. त्यांनी राजस्थान मध्ये प्रचार करतेवेळी आपली भूमिका मांडली आहे. आपले खेळाडू वर्ल्डकपमध्ये चांगले खेळत होते. परंतु मोदींमुळे त्यांना पराभव स्वीकारावा लागला, अशी टीका काँग्रेस खासदार राहुल गांधींनी केलीय. वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा पराभव होण्यास पंतप्रधान मोदीच जबाबदार आहेत, अशी टीका विरोधकांकडून टीका केली जातेय.

राहुल गांधींनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे पराभव झाल्याचं म्हटलं. पंतप्रधान मोदी टीव्हीवर येतात आणि हिंदू-मुस्लीम करतात. तर कधी क्रिकेट सामना पाहायला जातात. परंतु त्यांच्यामुळे टीम इंडिया हारली, असं राहुल गांधी म्हणालेत. विशेष म्हणजे राहुल गांधींच्या या आक्षेपार्ह विधानाचा व्हिडिओ काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी पक्षाच्या अधिकृत ‘एक्स’ वर (आधीच्या ट्विटरवर) पोस्ट केलाय.

Leave A Reply

Your email address will not be published.