विचखेडे येथे युरियाचे पाणी पिल्याने पाच म्हशीं दगावल्या !

0

पारोळा ,लोकशाही न्यूज नेटवर्क

पिकांसाठी सोडण्यात आलेल्या युरियामिश्रित पाणी पिल्याने ५ म्हशी दगावल्या असून इतर गुरांना वाचविण्यात डॉक्टरांना यश आले आहे. मात्र ५ म्हशी दगावल्याने ५ लाखांचे नुकसान झाले आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, पारोळा तालुक्यातील विचखेडे येथे एका शेतकऱ्याच्या शेतातील हौदावर पिकांसाठी युरियाचे पाणी तयार करून ते टिप्पर द्वारे सोडण्यात येत असल्यामुळे त्या हौदावर एका शेतकऱ्याच्या म्हशींनी पाणी पिल्यामुळे ५ म्हशी दगावल्याने शेतकऱ्याचे त्यात ५ लाखांचे नुकसान झाले आहे. त्यांच्यावर डॉ. शांताराम पाटील डॉ. संदीप पाटील,डाँ विजय वंजारी यांच्या सह इतर डॉक्टरांनी शवविच्छेदन करून सदर म्हशी या युरियाच्या पाण्याने मरण पावल्याचा निष्कर्ष दिला, तर इतर म्हशींवर उपचार करून सदर डॉक्टरांच्या पथकाने वाचविल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.