भाजप काका पुतण्याचं नातं तोडतं उद्धव ठाकरेंचा टोला

४ जून विजयाचा लोकशाहीचा दिवस...

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

जळगाव शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. सध्या शिवसेना पहिल्यापेक्षा अधिक जास्त मजबूत झाला आहे. शिवसेना काका – पुतण्याला एकत्र आणते, दुसरा पक्ष आहे तो नाते तोडतो. माणसं जोडणारी शिवसेना आहे. माझ्या संपत्तीवर ईडी टाकून बघा परत जाता की नाही. जळगाव म्हणजे माझं खान्देश आहे. बहिणाबाई चौधरी यांचे पुतणे सोपानदेव चौधरी. भाजपला पराभव दिसतोय म्हणून राम राम करताय. मनी नाही भाव आणि देवा मला पाव असे भाजपचे आहे. आमच्या मनात राम आहेच. राम मंदिर उभारणीत शिवसेनेचे काय योगदान आहे हे कुणाला सांगायची गरज नाही, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला. ते काल जळगाव येथून बोलत होते.

प[उधे बोलतांना ठाकरे म्हणाले, आजही अनेक जण मोदी मोदी करता आहे. बाभळीचे झाड त्यांच्या पार्श्वभागावर उगवले आहे परंतु त्याची मुळे कुठे गेली हेच त्यांना कळत नाही. प्रवाहाच्या विरुद्ध पोहत जाऊन तुम्ही शिवसेनेत आले म्हणून तुमचं कौतुक करावेसे वाटते. चांगल्या माणसाला आम्ही २०१९ मध्ये साथ दिले याचा आम्हाला अभिमान वाटतो. माणसं वापरून झाल्यावर फेकून द्यायची असे भाजपचे आहे. एक अकेला सब पे भारी, बाकी सब भ्रष्टाचारी. मोदींनी महाराष्ट्राशी गद्दारी केली. आज तुम्ही शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली. मोठी माणसं फोडली पण ती ज्यांनी मोठी केली ती छोटी माणसं आज माझ्यासोबत आहेत. आमच्या ४८ पैकी ४८ जागा निवडून येणार.

४ जून विजयाचा लोकशाहीचा दिवस आहे. आमचं गुजरात बद्दल वैर नाही. उद्या इंडिया आघाडीचे सरकार आल्यावर गुजरातच्या हक्काचे जे आहे ते त्यांना देणार पण महाराष्ट्राच्या हक्काचे देणार नाही. प्रेमाने आलिंगन द्या पण आमची वाघ नखे खुपसल्याशिवाय राहणार नाही. माझ्या सरकारमध्ये महिलांचा अपमान मी सहन करणार नाही. संविधान महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिले असून ते बदलण्यासाठी ४०० पारचा नारा लावत आहे. मणिपूर एक वर्ष झाले तरी अशांत आहे. मशाल नुसती निशाणी म्हणून नाही तर आमच्या स्वाभिमानाची आग आहे. आगीशी खेळू नका.

कांदा उत्पादकांना त्रास आहे. वर्षाला ६ हजार देतात आणि कृषी उत्पादनावर ५ ते १८ टक्के जीएसटी घेतात. ६ हजार भिक म्हणून देतात आणि सन्मान योजना सांगतात. मोदींनी लस शोधली म्हणून प्रमाणपत्रावर त्यांचा फोटो हे ठीक आहे पण खताच्या थैलीवर फोटो याचा काय संबंध आहे. आमचं सरकार असताना केवळ अंगठा घेत २ लाखांपर्यंत कर्ज माफ केले होते, हे फक्त अंगठा दाखवतात. कापसाची खाज तुम्हाला येते मात्र त्यांच्या सत्तेची खाज उतरवण्याची वेळ आली आहे. जळगावात कुणाला तरी रोजगार मिळाला का? भारत माता की जय बोलण्याचा अधिकार तुम्हाला नाही. आज भाजपकडे काही उत्तर नाही. मी सर्व मुद्द्यांवर बोलायला तयार आहे, तुम्हीसोबत बसा. जनतेच्या मुद्द्यावर बोला, असे आवाहन उध्दव ठाकरे यांनी अमित शहा यांना केले.

मोदी गॅरंटी म्हणजे तुम्हाला खायचं तेव्हढे खा असे आहे. मी जे वचन देतो आहे ते आम्ही पाळणारच. मोदी जिंकले तर पाकिस्तानात जास्त जल्लोष होईल. १० वर्षात केलेली कामे जनतेला सांगत नाही. महाराष्ट्र भोळा आहे पण स्वाभिमानी आहे. आम्ही मोडणार नाही पण जे महाराष्ट्राच्या विरोधात जातील त्यांना मिळाल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्राच्या लुटीची व्याजासह वसुली करणार. शेतीमालाला हमीभाव देणार. शेतीमालावरील जीएसटी हटविणार.

करण पवार म्हणाले की, सत्तेचा गैरवापर करून दबाव आणला जात आहे. अनेक मार्गाने त्रास होत आहे. आम्ही महिला उमेदवार असल्याने आपली संस्कृती जपत टीका करत नाही. माझ्यावर खालच्या पातळीवर टीका होत आहे. सोशल मीडिया फक्त डोके भडकवण्यासाठी केला जात आहे. एकदा उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाला एकदा संधी देऊन बघा. ३० वर्षात एकदा बदल करून संधी देऊन बघा. अनुक्रमांक १ असल्याने मशाल शोधणे सोपे होणार आहे. शेवटच्या दिवसापर्यंत आपला संघर्ष सुरू ठेवायचा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.