लोकशाही, न्यूज नेटवर्क
‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story’) चित्रपटाला आज रिलीज होऊन १५ दिवस होऊन गेले. तरीसुद्धा ह्या चित्रपटाचा वाद अजूनही कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. नागरिकांचे भरभरून प्रेम ह्या चित्रपटाला मिळत आहे. आणि एवढेच नाही तर, जोरदार विरोध असतांना सुद्धा ह्या चित्रपटाने १०० कोटींचा गल्ला जमावाला आहे. ज्वलंत विषयावरच्या या सिनेमाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. अशातच आता एक चर्चा रंगली आहे. ती म्हणजे ह्या चित्रपटाचा दुसरा भाग येणार का? यावर स्वतः दिग्दर्शकांनीच संकेत दिले आहे.
काय म्हणाले विपुल शाह?
‘द केरळ स्टोरी’चा सीक्वल असेल का, असे विचारले असता शाह म्हणाले, “आम्हाला जो विषय मांडायचा होता तो लोकांपर्यंत पोहोचला आहे आणि प्रेक्षक त्याचे कौतुक करत आहेत. या कथेने मानवी स्कतरीचे रॅकेट उघडकीस आणले आहे. जर याच कथेला पुढे नेणारा एखादा पॉईंट आढळला तर आम्ही विचार नक्कीच पुढच्या भागाचा विचार करू” असे शाह म्हणाले.