दहावी-बारावीच्या परीक्षांबाबत मोठा बदल

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

आगामी होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षांबाबत मोठा बदल करण्यात आला आहे. याबाबत औरंगाबाद विभागीय शिक्षण मंडळाने माहिती दिली आहे. फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना देण्यात आलेले होमसेंटर सुविधा आणि पेपर लिहिण्यासाठी दिलेला अर्धा तासाचा वाढीव वेळ रद्द करण्यात आला असल्याची माहिती विभागीय शिक्षण मंडळाचे सहसचिव वाय.एस.दाभाडे यांनी दिली आहे.

कोणता बदल

– 2023 मध्ये पूर्ण अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा होईल.

– यंदा होणाऱ्या परीक्षेत होम सेंटर राहणार नाही.

– तसेच 80 गुणांच्या पेपरसाठी दिलेला वाढीव अर्धा तास यावेळी मिळणार नाही.

– 60-40 गुणांसाठी असलेली अधिकची पंधरा मिनिटांची सवलत यंदा होणाऱ्या परीक्षेत विद्यार्थ्यांना मिळणार नाही.

– यंदा शंभर टक्के अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा होईल. (गेल्या वेळी 25% अभ्यासक्रम वगळला होता)

–  दिव्यांगांना मिळणारी सवलत कायम राहणार आहे.

अशी होती सवलत

कोरोना संकट लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी  माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना काही प्रमाणात दिलासा देण्यासाठी महत्वाचे निर्णय घेण्यात आले होते. यात परीक्षेत होम सेंटर देण्याचा निर्णय घेतला गेला होता. तर सोबतच 80 गुणांच्या पेपरसाठी वाढीव अर्धा तास देखील देण्यात आला होता. मात्र आता कोरोना परिस्थिती आटोक्यात असल्याने आगामी दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी वरील निर्णय रद्द करण्यात आले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.