लोकशाही न्यूज नेटवर्क
नाशिक: घरालोकशाही न्यूज नेटवर्क बाहेर ठेवलेल्या चावीचा वापर करून चोरट्याने कुलूप उघडून घरातील रोकड व दागिने चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सादेका अयुब खान (रा. नानावली) यांनी भद्रकाली पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद दाखल केली आहे. खान यांच्या फिर्यादीनुसार रविवारी (दि.२०) रात्री ९.३० च्या सुमारास त्या घरी नसताना चोरट्याने घराबाहेर ठेवलेली चावी घेत कुलूप उघडले.
त्यानंतर घरातील ५० हजार रुपये रोख व १५ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी भद्रकाली पोलिस तपास करीत असून चोरटा खान यांच्या ओळखीतलाच असल्याचा संशय पोलिसांना आहे.