मुंबईत भीषण आग, ७ जणांचा मृत्यू, आकडा वाढण्याची शक्यता

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

मुंबईच्या गोरेगावमधील इमारतीच्या पार्किंगमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या भीषण आगीत सात जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर 40 जण जखमी झालेत. तर 30 जणांना सुखरुप रेस्क्यू करण्यात आले असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे तर सध्या कुलिंगचं काम सुरु आहे. आगीचे कारण अद्याप समोर आले आहे. या आगीमुळं नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगाव पश्चिमेकडील जी रोडवरील जय भवानी ही ग्राउंड प्लस पाच मजल्याच्या इमारतीला ही भीषण आग लागली. ही आग लेवल दोन प्रकारची असल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाने दिली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळ गाठून आग विझवण्याचा प्रयत्न केला.

या आगीत अडकलेल्या 30 पेक्षा अधिक नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आला आहे तर 40 जण या आगीमध्ये जखमी झाले आहेत. जखमींमध्ये सात महिला आणि सात पुरुषांचा समावेश आहे. जखमींना अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ बाहेर काढून मुंबईच्या ट्रॉमा केअर आणि कुपर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या आगीत तळमजल्यावर वरील काही दुकाने आणि समोर पार्क असलेल्या गाड्या जळून खाक झाल्याची माहिती देखील मिळत आहे. नागरिक झोपेत असल्याने बाहेर पडण्यास उशीर झाला. त्यामुळे आकडा वाढल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.