नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्याने शिवसेनेला अनेक झटके बसताना दिसत आहे. त्यातच सुप्रीम कोर्टाने आज ठाकरे सरकारला झटका दिला आहे.
राज्यपालांनी बहुमत चाचणी करण्याचा आदेश दिला आहे. हा आदेश रद्द करण्यास कोर्टाने नकार दिला आहे. त्यामुळे उद्याच (30 जून) ठाकरे सरकारला बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार आहे.
शिंदे गटाने बंडखोरी केल्याने उद्धव ठाकरे यांचे सरकार अल्पमतात आले आहे. त्यामुळे उद्या ठाकरे सरकार कोसळणार की राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.