दुचाकी चोरट्यांना एलसीबीकडून अटक ; तीन दुचाकी हस्तगत

0

जळगाव;-दुचाकी चोरणाऱ्या दोन जणांना एलसीबीच्या पथकाने अटक केली असून त्यांच्याकडून चोरीच्या तीन दुचाकी हस्तगत केल्या असून त्यांच्याविरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुचाकी चोरीच्या घटनांना आळा बसावा यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजनपाटील यांना गुप्त माहिती मिळाल्यावरून त्यांनी पथक रवाना केले होते. पथकाने जळगांव तालुक्यातील रिधुर गावातील दोन संशयीत आकाश गोरखनाथ सोनवणे (वय २३) व मयुर भगवान कोळी (वय-२१) यांना ताब्यात घेतले. त्यांनी चोरीच्या ३ दुचाकी काढून दिल्या आहेत. तसेच त्यांचा आणखी एक साथीदार देखील निष्पन्न झाला आहे.

कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या पथकातील हवालदार जितेंद्र पाटील, नितीन बाविस्कर, अक्रम शेख, महेश महाजन, बबन पाटील, हेमंत पाटील, भारत पाटील, महेश सोमवंशी यांनी केली आहे. पथकाला कारवाईत तालुका पोलीस ठाण्याचे अंमलदार रामकृष्ण इंगळे व अभिषेक पाटील यांनी मदत केली असून तिन्ही दुचाकी अमळनेर शहरातून चोरी केल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.