कोथळी येथील नववधू हरवली : पोलिसात गुन्हा दाखल

0

मुक्ताईनगर , लोकशाही न्यूज नेटवर्क

मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील एक नववधू लग्नाच्या सहाव्या दिवशीच हरविल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत परंतु या संदर्भात पतीने पोलिसात मिसिंग दाखल केली आहे.

याबाबत मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील गजेंद्र सुभाष चौधरी यांचे लग्न सात फेब्रुवारी रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातील रीना हिच्या सोबत झाला होता त्यानंतर आज मुक्ताईनगर येथील साप्ताहिक बाजार असल्याने त्या ठिकाणी नववधू रीना ही सकाळी दोन महिलांसोबत बाजारात गेली होती त्यानंतर बाजारात नऊ ते साडेदहा वाजेच्या दरम्यान सदर नववधू आढळून आली नाही.त्यामुळे रात्री मुक्ताईनगर पोलिसात मिसिंग दाखल करण्यात आली आहे कॉन्स्टेबल उमेश महाजन हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.