केजरीवालांना अजून एक धक्का; दिल्ली उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली…

0

 

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

अरविंद केजरीवाल यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली आहे. केजरीवाल यांना आता तुरुंगातच राहावे लागणार आहे. न्यायालयाने ईडीची अटक वैध ठरवली असून ईडीने केजरीवाल यांच्याविरोधात पुरेसे पुरावे ठेवले असल्याचे म्हटले आहे. एएसजी राजू म्हणाले की, न्यायालयाने न्याय दिला आहे.

हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात केजरीवाल सर्वोच्च न्यायालयात जाणार आहेत

उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात केजरीवाल सर्वोच्च न्यायालयात जाणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केजरीवाल उद्याच सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतात. आम आदमी पार्टी उद्या सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करू शकते.

काय म्हणाले हायकोर्ट?

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांना दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी मोठा झटका बसला आहे. केजरीवाल यांना कोठडीतून दिलासा देण्यास स्पष्टपणे नकार देताना न्यायालयाने अनेक कठोर टिप्पणी केल्या आहेत. दिल्ली हायकोर्टाने स्पष्टपणे म्हटले आहे की, कोणत्याही व्यक्तीला, जरी तो मुख्यमंत्री असला तरी त्याला तपास आणि चौकशीच्या बाबतीत विशेष इम्युनिटी दिली जाऊ शकत नाही. हायकोर्टाने केजरीवाल यांना झटका देत आणखी अनेक कठोर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

ही याचिका जामिनासाठी नसून कोठडीला आव्हान देण्यात येत असल्याचे दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे. आपली अटक चुकीची असल्याचे याचिकाकर्त्याने म्हटले आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार केजरीवाल हे पक्षाचे संयोजक आहेत. हा पैसा गोव्यातील प्रचारासाठी वापरण्यात आल्याचा ईडीचा आरोप आहे. या संपूर्ण प्रकरणात याचिकाकर्त्याचा हात असल्याचे ईडीने म्हटले आहे. या प्रकरणी राघव, शरत रेड्डी यांच्यासह अनेकांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. हायकोर्टाने म्हटले आहे की, अनुमोदकाचे स्टेटमेंट ईडीने लिहिलेले नाही तर कोर्टाने लिहिले आहे. जर तुम्ही त्यावर प्रश्न उपस्थित करत असाल तर तुम्ही न्यायाधीशांवर प्राशन उठवत आहात.

Leave A Reply

Your email address will not be published.