दहिगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
यावल तालुक्यातील दहिगाव, सावखेडा सिम, किनगाव या शेतशिवारासह संपूर्ण तालुक्यात थंडीची लाट आल्याने केळी पिकावर करपा रोग पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. या रोगामुळे केळीचे खोड पिवळे होणे, केळीचे घड गळून पडत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना त्यांचा माल अल्प दराने छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांना द्यावा लागत आहे. शासनाने त्वरित अशा केळीचे पंचनामे करावेत व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.