निवडणुकीचे वारे; जळगावकर… या तारखेला नक्की मतदान कर…

0

 

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

देशातील लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा करताना निवडणूक आयोगाने सांगितले की, महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. यामध्ये पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला 5 जागांवर, दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलला 8 जागांवर, तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी 11 जागांवर, चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी 11 जागांवर आणि पाचव्या टप्प्यात 13 जागांवर मतदान होणार आहे. 20 मे रोजी टप्प्यात 13 जागांसाठी निवडणूक होणार आहे.

महाराष्ट्रात कोणत्या टप्प्यात कोणत्या जागांवर निवडणूक होणार आहे?

  • पहिल्या टप्प्यात १९ एप्रिलला – रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर येथे निवडणुका होणार आहेत.
  • दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिलला – बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशीम, हिंगोली, नांदेड, परभणी येथे निवडणुका होणार आहेत.
  • तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी – रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले येथे मतदान होणार आहे.
  • चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी – नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड येथे मतदान होणार आहे.
  • पाचव्या टप्प्यात २० मे रोजी – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघात मतदान होणार आहे.

कोणत्या टप्प्यात किती जागांवर निवडणूक?

पहिल्या टप्प्यात 102 जागांवर मतदान होणार असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले. दुसरा टप्पा २६ एप्रिलला 89 जागांवर मतदान होणार आहे. तिसऱ्या टप्प्यात ९७ जागांवर ७ मे रोजी मतदान होणार आहे. चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी 96 जागांवर मतदान होणार आहे. 20 मे रोजी पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान होणार आहे. 25 मे रोजी सहाव्या टप्प्यात 57 जागांवर मतदान होणार आहे. सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात 1 जून रोजी 57 जागांवर मतदान होणार आहे. निवडणुकीचा निकाल 04 जून रोजी जाहीर होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.