आता स्वर्गात माझ्या अक्षयसोबत मी…

0

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क;

जगात मानसिक समाधानाखेरीज मानव सुखी होऊच शकत नाही. मग तो कितीही धनवान किंवा बलाढ्य का असेना. पण जेव्हा एखाद्याचे मानसिक खच्चीकरण होते, आणि त्याला जगणं निरस वाटू लागत तेव्हा तो कुठल्या स्थाराला जाईल हे कोणालाही सांगता येणं शक्य नाही. नागपूर येथील गोपालनगर भागात राहणाऱ्या एका तरुणीने “माझा प्रियकर अक्षयच्या मृत्यूमुळे मी पूर्णपणे खचली आहे. त्यामुळे माझी जगण्यची इच्छा नाही. आता स्वर्गात माझ्या अक्षयसोबत मी सुखाने जगू शकेल. त्यामुळे मी आत्महत्या करीत आहे.” अशी चिठ्ठी लिहून तरुणीने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली.

अधिक माहितीनुसार अंबाझरी गार्डन जवळील, सौभाग्य रेस्टारेंटच्या गच्चीला लागून असलेल्या उंबराच्या झाडाला एका तरुणीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. तरुणीने हाताला व मनगटाला धारदार ब्लेडने चिरे मारलेले होते. पोलिसांना तिच्याजवळ एक चिठ्ठी मिळाली. त्यावरून तिची ओळख पटली. तिचे नाव अनामिका दंदरे असल्याचे पोलिसांना समजले. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत अनामिकाने ‘जीवनाला कंटाळली असून माझ्या आत्महत्येसाठी कोणालाही जबाबदार धरू नये. मी माझ्या प्रियकरासोबत सुखी राहणार आहे. असेही तिने त्यात लिहिले होते.

दरम्यान पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांशी संपर्क केला. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, अनामिकाचा प्रियकर अक्षय याचा तीन महिन्यांपूर्वी अपघातात मृत्यू झाला होता. तेव्हापासूनच ती नैराश्यात होती. तेव्हापासून तिच्या वागण्यातही फरक पडला होता. तिने यापूर्वीही जगण्यात अर्थ नसल्याचे सांगून आत्महत्या करण्याबाबत विचार बोलून दाखवला होता. आईवडिलांना एकुलती असलेली अनामिका नामांकित महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षांला शिक्षण घेत होती. याप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.