हरियाणा सरकारने ७ जिल्ह्यात इंटरनेट सेवा केली बंद

0

चंदीगड;- हरियाणा सरकारने राज्यातील 8 जिल्ह्यांमध्ये मोबाईल इंटरनेट, डोंगल आणि बल्क एसएमएस 3 दिवसांसाठी बंद केले आहेत. 13 फेब्रुवारी रोजी पंजाब आणि हरियाणामधून दिल्लीकडे निघणाऱ्या शेतकऱ्यांच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

करण्यात आले आहे. दिल्ली सीमेवरील चौक्यांवर चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून रस्त्यावर खिळे ठोकण्यात आले आहेत. सिमेंट ब्लॉक उभारून शेतकरी संघटनांचा मोर्चा रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे.

अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हरियाणाच्या अंबाला, कुरुक्षेत्र, कैशल, जिंद, हिसार, फतेहबाद आणि सिरसा या जिल्ह्यांमध्ये १३ फेब्रुवारीच्या रात्री १२ वाजेपर्यंत मोबाइल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.