टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे अपघातात निधन…

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क;

टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईला लागून असलेल्या पालघरमध्ये हा अपघात झाला आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांची कार रविवारी महाराष्ट्रातील पालघरमध्ये दुभाजकाला धडकली. मिस्त्री हे मर्सिडीज कारमधून अहमदाबादहून मुंबईला जात होते. या घटनेत कार चालकासह अन्य दोन जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना गुजरातमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “दुपारी ३.१५ च्या सुमारास हा अपघात झाला. मिस्त्री अहमदाबादहून मुंबईला जात होते. सूर्या नदीवरील पुलावर हा अपघात झाला. शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे यांनी 54 वर्षीय सायरस मिस्त्री यांच्या निधनावर ट्विट करून शोक व्यक्त केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.