लोकशाही न्यूज नेटवर्क
कोल्हापूर मधील महा अधिवेशनामध्ये एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घडाघाती टीका केली. ठाकरे गटाकडून शिंदे गटाचा आमदारांवर ’50 कोटी एकदम ओके’ अशी टीका केली होती. याचाच धागा पकडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 50 कोटी मागितल्याचा एका पत्राबाबत गौप्य स्फोट केला आहे. नेमकं कोणी पाठवलं होतं? आणि पत्रात नेमकं काय होतं? याबाबत एकनाथ शिंदे यांनी जाहीरपणे भाष्य केले आहे.
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
आमच्यावर फक्त आरोपच आरोप करत आले आहेत. आरोप करण्याचा अधिकार तुम्हाला आहे? का 50 कोके 50 खोके सर्व नेतेमंडळी समोर आहेत. शिवसेना सोडून इतर पक्षातील नेते आपल्याकडे येत आहेत. आपल्याला जेव्हा शिवसेना मिळाली, तेव्हा त्यांच्या पायाखालची वाळू घसरली, त्यांना धडकी भरली. तुमची आम्हाला संपत्ती नको. बाळासाहेब हीच आमची संपत्ती आहे. धनुष्यबाण मिळाल्यावर शिवसेनेच्या खात्यातून 50 कोटी आम्हाला मिळाले पाहिजे असे पत्र पाठवलं. त्यांना बाळासाहेबांचे विचार नको त्यांना पन्नास कोटी हवे आहेत . असं एकनाथ शिंदे म्हटले आहे
उद्धव ठाकरे दिसतात तसे नाही. त्यांच्या चेहऱ्यामागे अनेक चेहरे लपले आहेत. तुमच्यावर आले संकट मी छातीवर घेतली आहे. माझ्याकडे खूप गोष्टी आहेत. ज्या वेळेला बोलायची वेळ येईल त्यावेळी मी बोलेल, बाळासाहेब असताना मातोश्री पवित्र मंदिर होतं. आता मातोश्री उदास झाली आहे. जिथे वाघाची डरकाळी येत होती, तिथे रडण्याचा आवाज येतो असं एकनाथ शिंदे म्हणाले.