देवेंद्र फडणवीस असत्य बोलून राजकारण करणार नाहीत – चंद्रशेखर बावनकुळे

0

मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. शरद पवार यांच्या संमतीनेच पहाटेचा शपथविधी झाला होता असा गौप्यस्फोट फडणवीस यांनी केला होता. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही प्रतिक्रिया देत देवेंद्र फडणवीस असत्य बोलून कधीच राजकारण करत नाहीत असे त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

देवेंद्र फडणवीसांनी संपूर्ण खुलासा केला आहे. मागच्या 28-30 वर्षांपासून देवेंद्र फडणवीसांना आपण ओळखतो. ते असत्य बोलून कधीच राजकारण करत नाहीत. षडयंत्र करून, पाठीत खंजीर खुपसून, खोटे बोलून सत्ता मिळवणे त्यांच्या रक्तात नाही. पद मिळाले नाही तरी चालेल. ते खोटं बोलून मोठे झाले नाहीत. त्यांच्यावर गंगाधर फडणवीस यांचे संस्कार आहेत. आणि सस्वयंसेवक म्हणून ते चुकीचा मार्ग निवडू शकत नाही. जे घडलं असेल तेच त्यांनी इमानदारीनी सांगितले असेल, अशी प्रतिक्रिया बावनकुळे यांनी दिली.

ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांवरही बावनकुळे यांनी सडकून टीका केली. राऊतांवर महाराष्ट्राने विश्वास ठेवणं बंद केलं आहे. संजय राऊत हे जेलमध्ये गेल्यापासून शिवराळ भाषेत बोलणं सुरू केलं आहे. त्यांना देवेंद्रजी कळलेच नाहीत. संजय राऊत यांची फडणवीस यांच्यावर बोलण्या इतकी त्यांची उंची नाही, असा घणाघात बावनकुळे यांनी केला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.