दीड वर्षीय मुलीचा बादलीत बुडून मृत्यू

0

धुळे, लोकशाही न्यूज नेटवर्क

एक दीड वर्षीय बालिकेचा बादलीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी धुळे तालुक्यातील तिखी गावाजवळ गोपाळनगर या परिसरात घडली आहे. यामध्ये रागिणी रवींद्र ठाकरे असे मृत बालिकेचे नाव असून घटना उघड होताच परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सविस्तर माहिती अशी की, एरंडोल तालुक्यातील कासोदा येथील रवींद्र उत्तम ठाकरे हे कनाशी गावाजवळ राहत असून, गेल्या काही वर्षांपासून ते गोपाळनगर येथे वास्तव्यास आहे. त्यांना दीड वर्षाची मुलगी होती. गुरुवारी सकाळी ठाकरे कुटुंबीय घराजवळील शेतात कमला गेले होते. त्यांनी आपल्या मुलीस शेतातील झाडाजवळ खेळण्यासाठी सोडले होते. त्या झाडाजवळ प्लास्टिक मोठी बादली पाण्याने भरलेली होती. त्या बादलीतील ती खेळत होती. खेळता खेळाता तिच्या हातातील वाटी बादलीत पडली. ती वाटी काढण्याच्या प्रयत्नात तिचा तोल गेला व ती बादलीत पडली. तिच्या नाकातोंडात पाणी गेल्याने तिचा मृत्यू झाला. दरम्यान बालिका दिसत नसल्याने तिच्या आईने तिला शोधण्यासाठी बादलीकडे धाव घेतली असता, तिला मुलीचे पाय वर दिसले. मुलगी पाण्यात बुडाल्याचे बघताच आईने एकच हंबरडा फोडला.

Leave A Reply

Your email address will not be published.