बापरे.. मुलाला खांबाला बांधून मारहाण, तोंडात कोंबली मिरची

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

उत्तर प्रदेशच्या आझमगड जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरीच्या संशयावरून एका मुलाला खांबाला बांधून मारहाण केल्याची घटना घडली.  सदर घटना आझमगडच्या बरदह भागातील हदिसा गावात घडली.

स्थानिकांना मुलाने मोबाइल चोरल्याचा संशय होता. मुलाच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार केली आहे. आझमगडच्या एसपी सिटीने आरोपींवर कठोर कारवाई करण्याची ग्वाही दिली आहे. बरदह भागातील हदिसा गावच्या रामकेश राम यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यात त्यांनी गावातीलच रामआसरे राम, संजय राम, सुरेंद्र राम व विजयी राम यांनी मोबाइल चोरीच्या संशयावरुन ४ दिवसांपूर्वी आपल्या मुलाला मारहाण केल्याचा आरोप केला आहे. माझा मुलगा खेळत होता. त्याला विजेच्या खांबाला बांधून मारहाण करण्यात आली.

तसेच मुलाच्या वडिलाचा आरोप आहे की, जवळपास ३ तास हात-पाय बांधून मारहाण झाली. पाणी मागल्यावर त्याच्या तोंडात मिरची कोंबण्यात आली. गावातील लोकांनी मूकदर्शक बनून ही घटना पाहिली. मात्र कुणीही त्याला सोडवण्याचा प्रयत्न केला नाही. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक अनुराग आर्य यांनी प्रभारी निरीक्षकांना फैलावर घेत गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. या निर्दयी मारहाणीनंतर चिमुरड्याच्या कानातून रक्तही येत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.