धक्कादायक; संशयावरून पतीने केली पत्नीसह तीन मुलांची हत्या…

0

 

छत्तीसगड, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

छत्तीसगडमधील बिलासपूर जिल्ह्यात विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयावरून एका ३४ वर्षीय व्यक्तीने पत्नी आणि तीन मुलांचा गळा दाबून खून केला. पोलिस अधिकाऱ्यांनी मंगळवारी ही माहिती दिली. बिलासपूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक (एसपी) संतोष सिंह यांनी सांगितले की, जिल्ह्यातील मस्तुरी पोलिस स्टेशन हद्दीतील हिरी गावात उमेंद्र केवटने पत्नी, दोन मुली आणि एका मुलाचा गळा दाबून खून केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. मुलांचे वय अनुक्रमे पाच वर्षे, चार वर्षे आणि दोन वर्षे आहे.

सिंह म्हणाले की, पोलिसांनी हत्येच्या आरोपाखाली केवटला अटक केली आहे. चौकशीत केवटने पोलिसांना सांगितले की, त्याला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता, त्यामुळे त्याने तीचा खून केला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भात अधिक माहिती तपासानंतर मिळेल.

Leave A Reply

Your email address will not be published.