भोपाळ ;- मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचं सरकार आल्यास नागरिकांना मोठ्या सवलतील मिळणार आहेत. त्यासंदर्भात स्वत: काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधींनी गुरुवारी निवडणूक प्रचारादरम्यान जनतेला आश्वासन दिले. त्यानुसार, १० मुद्द्यांचा लाभ सर्वसामान्यांना मिळणार असल्याची गॅरंटी देण्यात आली आहे. ५०० रुपयांत गॅस सिलेंडर आणि महिलांना दरमहा १,५०० रुपये देण्यात येणार आहेत. तसेच, १ ली ते १२ वी पर्यंत मोफत शिक्षण, १०० युनिट वीज मोफत देण्याचीही घोषणा काँग्रेसने केली आहे.
काँग्रेसने दिली गॅरंटी
१ – महिलासाठी १५०० रूपये महीने
२ – ५०० रुपयांत गॅस सिलेंडर
३ – १०० यूनिट वीज बिल माफ, २०० यूनिट का बिल हाफ
४ – १ ते १२ वी पर्यंतच शिक्षण मोफत
५ – जुनी पेंशन योजना लागू
६ – शेतीसाठी ५ हॉर्स पावर वीज मोफत
७ – ओबीसींना २७% आरक्षण
८ – पीएम आवास योजनेंतर्गत ग्रामीण व शहरी भागासाठी समान आर्थिक लाभ
९ – जातनिहाय जनगणना होणार
१० – शेतकऱ्यांवरील गुन्हे वापस घेणार