मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते ‘शासन आपल्या दारी’ योजनेचा शुभारंभ

0

लोकशाही, न्यूज नेटवर्क

 

छत्रपती संभाजी नगर (Chhatrapati Sambhaji Nagar) मधील कन्नड याठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) आले असता, ‘शासन आपल्या दारी’ या योजनेचा शुभारंभ केला. यावेळी परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने आपली उपस्थिती दर्शवली होती. शेतकऱ्यांशी बोलतांना एकनाथ शिंदे म्हणाले, ‘सरकार आपल्या दारी’ हि योजना सर्वसामान्यांना दिलासा देणारी आहे. १ लाख ४९ हजार ५७२ लाभारती आहे. ५५१ कोटी रुपयांचे साहित्य शेतकऱ्यांना वाटप होणार असून, यामध्ये सर्व योजनांचा समावेश करण्यात आला आहे.

पुढे बोलतांना शिंदे म्हणाले कि या सरकाने शेतकरी राजाच्या हिताचेच निर्णय घेतले आहे. एनडीआरएफच्या मदती वाढ करण्यात आली आहे. गोगलगायीनीं केलेल्या नुकसानीला मदतीच्या कक्षेत आणून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे या सर्वसामान्यांच्या सरकारवर जनतेचा विश्वास असल्याचं ते म्हणाले. शासन आपल्या दारी ही योजना सर्वसामान्यांच्या दारात सराकरी योजना घेऊन जाण्याचा प्रकल्प असल्याचं शिंदे म्हणाले.

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.