जळगाव ;- तालुक्यातील नशिराबाद गावातून एक विवाहिता शौचालयाला जाऊन येते असे सांगून घरातून कनिघूं गेली. अमात्र ती परत न आल्याने पतीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांत हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, नशिराबाद येथी रहिवाशी यांनी दिल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, त्यांची पत्नी वय ३० ह्या २२ जून २०२३ रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास शौचालयास जाऊन येते असे सांगून निघून गेल्या. त्यांचा सर्वत्र शोध घेतला असता त्या मिळून न आल्याने त्यांच्या पतीने दिलेल्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलीस स्थानकात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.