“ते आयत्या बिळावरचे नागोबा..”, महाजनांचे उद्धव ठाकरेंना उत्तर

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

22 जानेवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर सोहळ्यावरून राजकरण तापले आहे. अयोध्येत श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारी रोजी होणार आहे. या कार्यक्रमासाठी अयोध्येत जोरदार तयारी सुरु आहे. व्हीव्हीआयपी लोकांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. या सोहळ्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रण पाठवण्यात आले नाही.  मात्र राज ठाकरे यांना मात्र निमंत्रण मिळाले आहे. त्यावरुन खासदार संजय राऊत सातत्याने टीका करत आहेत. त्यांच्या टीकेला राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी उत्तर दिले आहे.

उद्धव ठाकरे हे साधे आमदार आहेत. त्यांना अयोध्येतील सोहळ्याला बोलावण्याचे कारण काय?, तसेच केंद्राला वाटेल त्यांचा व्हीव्हीआयपीच्या यादीत समावेश असेल. केंद्र सरकारच्या व्हीव्हीआयपीच्या यादीत उद्धव ठाकरे नसतील पण राज ठाकरे असतील. त्यामुळेच राज ठाकरे यांना निमंत्रण दिले असेल, असे महाजन यांनी म्हटले आहे.

महाजन पुढे म्हणाले, ‘ श्रीराम मंदिरासाठी उद्धव ठाकरे यांचे योगदान काय आहे. घरात बसून भूमिका घेणे आणि प्रत्यक्ष कारसेवा करणे यात फरक आहे. आम्ही वीस, वीस दिवस कारागृहामध्ये होतो. तेव्हा संजय राऊत आणि उद्धव ठाकरे कुठे होते? बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेबाबत दुमत नाही. मात्र जे बोलतायेत ते आयत्या बिळावरचे नागोबा आहेत’, असे महाजन म्हणाले. तसेच संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी कारसेवा केल्याचा एखादा फोटो दाखवावा असेही महाजन यांनी म्हटले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.