जळगाव ;- एका ४२ वर्षीय महिलेने राहत्या घराच्या दुसऱ्या मजल्याच्या खोलीत दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना मन्यारखेडा शिवारातील सुधाकर नगरात सोमवारी २९ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता उघडकीस आली आहे. आत्महत्येचे कारण याद्या स्पष्ट नसून याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात नोंद घेण्याचे काम सुरू होते. संध्या निळकंठ पाटील वय ४२ रा. सुधाकर नगर, मन्यारखेडा शिवार, जळगाव असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, मन्यारखेडा शिवारातील सुधाकर नगरात संध्या पाटील या महिला आपले पती निळकंठ पाटील आणि मुलगा मयूर यांच्यासोबत राहायला होत्या . संध्या पाटील ह्या किरणादुकान चालवून ते आपला घराला हातभार लावत होत्या. सोमवारी २९ एप्रिल रोजी सकाळी त्यांचे पती निळकंठ पाटील हे एमआयडीसीतील पाईप कंपनीत कामाला निघून गेले. तर मुलगा मयूर हा बाहेर गेला होता . त्यामुळे त्या घरात एकट्या असतांना त्यांनी राहत्या घराच्या दुसऱ्या मजल्याच्या खोली गळफास घेवून आत्महत्या केली. मयुर हा घरी आल्यावर हा प्रकार लक्षात आला. त्यांने आरडाओरड करत शेजारचांच्या मदतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशांत निकुंभ यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते.