लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगावच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीस भरधाव ट्रकने मागील बाजूने धडक देत दोघांना चिरडून तब्बल १४ किलोमीटर दुचाकी ओढत नेल्याचा प्रकार गुरुवारी (दि.१५) रोजी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास घडला आहे. या घटनेत दोघे दुचाकीस्वार जागीच ठार झाले आहे. हा अपघात राष्ट्रीय महामार्ग क्र.५३ वरील एका ढाब्यासमोर घडला.
जळगावच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीस भरधाव ट्रकने (क्र. आर.जी ११, जीजे ९९०३) मागील बाजूस धडक देऊन दुचाकीस्वार जितेंद्र राठोड (वय अंदाजे ४०) जळगाव तर सोबत असणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीला (नाव माहित नाही) ट्रकने चिरडले.
दुचाकी ट्रकच्या समोरील दोघा चाकांच्या मधोमध अडकल्याने ट्रकचालकाने तब्बल दुचाकी चौदा किलोमीटर ओढून नेली. अखेर नशिराबाद टोलनाक्याजवळ पोलिसांनी ट्रक थांबवून ट्रकचालक व किन्नर या दोघांना ताब्यात घेतले.
दुचाकीस्वार मृत झालेल्या दोघांना राष्ट्रीय महामार्ग येथून ट्रामा केअर सेंटरमध्ये शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे. उशिरापर्यंत बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.