बांभोरीजवळ भीषण अपघात : ३ भाविक ठार, ४ जखमी

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव शहराजवळ असलेल्या बांभोरी गावाजवळ आज सकाळी पाच वाजता भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात तीन भाविक ठार झाले तर चौघे जखमी झाले आहेत. महादेवाची पिंड आणण्यासाठी ओमकारेश्वर जाण्यासाठी निघालेल्या भाविकांचा अपघात झाला.

जळगावातील खोटे नगर परिसरात असलेल्या साईनगर भागात महादेवाचे मंदिर बांधले जात आहे. मंदिरात महादेवाची पिंड प्राणप्रतिष्ठा करायचे नियोजन असल्याने शुक्रवारी ७ नागरिक ओंकारेश्वर (मध्यप्रदेश) येथे जात होते. सकाळी ४.३० वाजेच्या सुमारास सर्व निघाले होते.दरम्यान बांभोरी गावाजवळ केबीएक्स कंपनीच्या चौकात एका भरधाव ट्रालाने क्रुझरला धडक दिली.

या अपघातात तुषार जाधव (वय २५, रा. खोटे नगर, मूळ गाव धोबी वराड), विजय हिंमतराव चौधरी (वय ४२ रा.साई नगर), भूषण सुभाष खंबायत (वय ४५ रा.साईनगर) यांचा अपघातात मृत्यू झाला असून ४ भाविक जखमी आहेत. अपघाताची माहिती मिळताच बांभोरी ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली. घटनास्थळी  क्रेन मागवून क्रूझर बाजूला करण्यात आली असून अपघातग्रस्त वाहने पाळधी पोलीस ठाण्यात नेण्यात आली. तर जिल्हा सामान्य रुग्णालयात नातेवाईकांची प्रचंड गर्दी झाली आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.