दुर्देवी: दिंडीत भरधाव कंटेनर घुसल्याने 4 जणांचा मृत्यू, 7 जखमी

0

आळंदी, लोकशाही न्यूज नेटवर्क  

पालखी संगमनेरच्या दिशेनी आळंदीकडे जात असतांना मागून भरधाव वेगाने आलेल्या कंटेनर थेट पालखीत शिरल्याने हा अपघात झाला. शिर्डीतील श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर ट्रस्टचे ह.भ.प. काशिकानंद महाराज यांच्या शिर्डी ते आळंदी पालखीला अपघात झाला आहे.

या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून नऊ वारकरी जखमी झाले आहेत. जखमींवर संगमनेर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शिर्डीतील श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर ट्रस्टचे ह.भ.प. काशिकानंद महाराज हे दरवर्षी शिर्डी ते आळंदी श्री साईबाबा पालखी सोहळा गेल्या 36 वर्षांपासून आयोजित करतात. यंदाच्या 37 वे वर्ष आहे. या पालखीत, नाशिक, शिर्डी, अहमदनगर जिल्ह्यात साधरणात 250 ते 300 वारकरी सहभागी झाले होते.

ही पालखी गुरुवारी शिर्डीतून आळंदीच्या दिशेने रवाना झाली होती. पालखी संगमनेर तालुक्यातील पुणे – नाशिक महामार्गावरील 19 मैल येथे पोहचली त्यावेळी अपघात झाला. अचानक भरधाव वेगाने नाशिकच्या दिशेने पुण्याकडे जात असलेला MH12 VT 1455 नंबरचा कंटेनर थेट पालखीत शिरल्याने हा अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा जागीच तर दोन वारकऱ्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. अपघातात नऊ वारकरी जखमी असून जखमींना संगमनेर येथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

ही दुर्दैवी घटना रविवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान या अपघाताला कारणीभूत असणारा कंटेनर चालक नशेत असल्याचे तसेच त्याला डुलकी लागली असल्याचे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे. या अपघातातील मृत्यू झालेल्या वारकऱ्यांमध्ये भाऊसाहेब नाथा जपे (कनकुरी), बाळासाहेब अर्जुन गवळी (मढी बु,ता.कोपरगाव), बबन पाटीलबा थोरे (द्वारकानगर,शिर्डी), ताराबाई गंगाधर गमे (कोऱ्हाळे,ता.राहता) यांचा समावेश आहे. दरम्यान कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.