आगीमध्ये पत्र्याची तीन घरे जळून खाक

0

जळगाव : – गॅस सिलेंडर फुटल्याने लागलेल्या आगीमध्ये पत्र्याची तीन घरे जळून खाक झाले. ही घटना सोमवार दि. १८ रोजी जळगाव तालुक्यातील मन्यारखेडा परिसरात घडली.

तसेच घरातील फ्रिज, कपाट, कपडे, धान्य, भांडे, महत्त्वाची कागदपत्रे, रोख रक्कमसह सर्व काही आगीच्या विळख्यात सापडल्याने चार कु टुंबाच्या संसाराची राखरांगोळी झाली. जळगाव तालुक्यातील मन्यारखेडा परिसरातील साईनगर भागात मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबांची घरे आहेत. यापैकी एका शेजारी एक असलेल्या पत्र्यांच्या तीन घरांमध्ये नितीन भटकर, अशोक भटकर, रोहित सुनील भारुळे, रमेश यशवंत शिंदे यांचे कुटुंब वास्तव्यास आहे. सोमवारी सकाळी या चारही कुटुंबातील सदस्य नेहमीप्रमाणे कामावर गेले खाक झाले.

सिलिंडर फुटल्यामुळे ही आग लागल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. दोन बंबांनी आग आटोक्यात आगीची माहिती महापालिकेच्या अग्नीशमन विभागाला देण्यात आली. त्या वेळी निवांत इंगळे, प्रदीप धनगर, संजय तायडे, भूषण पाटील, नितीन ससाने, चेतन सपकाळे हे तेथे पोहचले व त्यांनी दोन बंबाद्वारे आग नियंत्रणात आणली. मात्र तोपर्यंत आगीने रौद्ररुप धारण केल्यामुळे त्या घरांमधील सर्व साहित्य जळून सिलिंडर फुटल्याने परिसर हादरला

Leave A Reply

Your email address will not be published.