केंद्र सरकारच्या निषेधार्थ पाचोऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे धरणे आंदोलन

0

पाचोरा, प्रतिनिधी

पाचोरा विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, माजी आमदार दिलीप वाघ यांच्या नेतृत्वाखाली जनतेच्या ज्वलंत मागण्यांच्या संदर्भात केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणाचे विरोधात आज  तहसिल कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.  सर्वसामान्य जनता, शेतकरी, शेतमजूर, कामगार, विद्यार्थी, युवक यांना जीवन जगावे लागत आहे. या कठीण परिस्थितीत आमच्या जीवन-मरणाशी संबंधित मागण्यांचे निवेदन केंद्र सरकारपर्यंत पोहचविण्यासाठी सदरचे धरणेआंदोलन छेडण्यात आले.

यावेळी  माजी आमदार दिलीप वाघ, न. पा. गटनेते संजय वाघ, विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन तावडे, जिल्हा प्रवक्ते खलिल देशमुख, तालुका अध्यक्ष विकास पाटील, भडगाव तालुका अध्यक्ष संतोष जाधव, शहराध्यक्ष अजहर खान, पंचायत समिती सदस्य ललित वाघ, जिल्हा उपाध्यक्ष शालिग्राम मालकर, अजय अहिरे,  नगरसेवक अशोक मोरे, रामधन परदेशी, प्रकाश एकनाथ पाटील, सुदाम पाटील, युवक जिल्हा संघटक उमेश एरंडे, जिल्हा सचिव सचिन शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष पंकज गढरी, महिला आघाडीच्या ज्योती संजय वाघ, रेखा देवरे, भडगाव न. पा. नगरसेवका योजना पाटील, भडगाव तालुका अध्यक्षा रेखा पाटील, अमळदे – गिरड गटाच्या जि. प. सदस्या स्नेहा गायकवाड, जिल्हा उपाध्यक्षा सरला पाटील, युवतींच्या अध्यक्षा अभिलाषा रोकडे, सुनिता वारुळे, दिपमाला पाटील, भडगाव युवक अध्यक्ष हर्षल पाटील, गौरव पाटील यांचे सह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी माजी आमदार दिलीप वाघ यांनी केंद्र सरकारच्या विरोधात बोलतांना सांगितले की, देशातमध्ये हुकुमशाही पध्दतीचे राजकारण सुरू आहे. इंधनदर वाढ गगनाला भिडत आहे. शेतकऱ्यांच्या शेती पंपाच्या विजेचा प्रश्न तसेच बि – बियाण्यांच्या प्रश्न असेल सर्वच बाबींनी शेतकरी होरपळून निघाला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भावनिक वातावरण निर्माण करुन सर्व सामान्यांच्या भावनांशी खेळुन सत्ता काबिज करण्याचे पाप भाजपा सरकारने सुरू ठेवले आहे. परंतु या नाकर्ते केंद्रातील भाजपा सरकारला येत्या निवडणुकांमध्ये त्यांची जागा दाखवून द्या. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार चांगले करत असतांना केंद्र शासनाने ईडीची चौकशी करण्याचे आदेश दिले असुन या चौकशीत त्यांना काहीच सिध्द करता येणार नाही. असेही आंदोलना प्रसंगी माजी आमदार दिलीप वाघ यांनी सांगितले.

या मागण्यांसाठी झाले आंदोलन

डिझेल, पेट्रोल व स्वयंपाकाचा गॅस अशा विविध पेट्रोलजन्य इंधनाचे व खाद्य तेलाचे भाव सातत्याने गगनाला भिडत आहेत, सर्वसामान्य माणसाला त्याचा त्रासदायक भार सहन करावा लागत आहे,  इंधनाचे भाव त्वरित कमी करण्यात यावे, खरीप पिकांच्या पेरणीच्या सध्याच्या काळात शेतकऱ्यांना बी – बियाणे, खते, कीटकनाशक खूपच महागड्या दरात खरेदी करावे लागत आहेत, तसेच खरेदीदार शेतकऱ्यांना नोंदणी, आधार कार्ड वगैरे पुराव्यांच्या नको त्या जाचक अटी लागू केल्या आहेत. एक प्रकारे सर्व प्रामाणिक शेतकऱ्यांकडे संशयाच्या नजरेने पाहण्याचा हा कार्यक्रम राबवला जात आहे. तरी शेतकऱ्यांशी सुरू असलेली ही त्रासदायक वर्तणूक बंद करावी व गरजेनुसार बी – बियाणे, खते, कीटकनाशकांचा पुरवठा करावा, आणि या सर्व वस्तूंचे भाव कमी करण्यात यावे. महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाच्या मागणीला अतिशय विकृत स्वरूप देऊन जनतेच्या मनात गोंधळ निर्माण करून “ओबीसी विरुद्ध मराठा” असा नवा वाद निर्माण करण्याचे उद्योग केंद्र सरकारच्या यंत्रणेने सुरू केले आहेत. त्या निरर्थक पण समाजात आणि जाती – जातीत संघर्ष निर्माण करणाऱ्या उपद्व्यापाना पायबंद घालण्यात यावा आणि सकल मराठा समाजाच्या मागण्या कोणत्याही अन्य समाजघटकांना धक्का न लागू देता मान्य करणाऱ्या भूमिकेला केंद्राने पाठिंबा द्यावा, कोविड प्रतिबंधक लसीचा तुटवडा केंद्र सरकारच्या बेजबाबदार आणि आडमुठ्या धोरणामुळे निर्माण झालेला आहे. सर्वसामान्य जनतेला लसीकरणासाठी वणवण भटकावे लागत आहे. कोविडसारख्या जीवन-मरणाशी  संबंधित कठीण महामारीचे निर्मूलनाच्या नियोजनात भाजपा विरोधी राज्यांशी दुजाभाव केला जात आहे. तो त्वरित  थांबवावा आणि कोविड प्रतिबंधक लस सर्वत्र तसेच मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्याव्यात या ज्वलंत मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी भडगाव शहराध्यक्ष शाम भोसले, कार्याध्यक्ष हर्षल पाटील, जिल्हा उपाध्यक्ष विजय पाटील, युवक शहराध्यक्ष सुदर्शन सोनवणे  सतिष चौधरी, लीगल सेल अध्यक्ष अॅड. अविनाश सुतार, भडगाव युवक रा. काँ. स्वप्नील पाटील, विनोद तावरे, डॉ. अमृत पाटील, बशीर बागवान, जिल्हा सरचिटणीस गौरव पाटील, प्रदीप पाटील, परेश पाटील, हरून देशमुख, अरुण पाटील, भगवान मिस्तरी, सत्तार पिंजारी, रजू बागवान, तारीख शेख,  निलेश पाटील, तेजस पाटील, बंटी मगर, दिलावर तडवी, गुलाब तडवी, जमीर तडवी, विलास सोनवणे, विलास पाटील, अशोक सोनवणे उपस्थित होते. आंदोलना नंतर नायब तहसिलदार संभाजी पाटील यांना निवेदन देण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.