अजब: प्रेमी युगुलाच्या आत्महत्येनंतर लावला मृतांच्या पुतळ्यांचा विवाह !

0

लोकशाही न्युज नेटवर्क

प्रेमविवाहाला अनेक जाती धर्मांमध्ये मान्यता दिली जात नसल्याने या विवाहाला समाजातून विरोध होतो. असाच विरोध एका प्रेमी युगुलाला झाल्यानंतर त्यांनी टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या केली. मात्र त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून दोघांच्या पुतळ्यांचे निर्माण करून त्यांचा विवाह लावून दिल्याचा प्रकार
गुजरातमधील तापी जिल्ह्यात घडला . नेवाळा गावात राहणाऱ्या प्रेमी युगुलाचे प्रेम संबध त्यांच्या कुटुंबीयांना मान्य नव्हते. त्यांच्या लग्नाला घरच्यांचा लग्न विरोध होता. मात्र, अखेर त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचे प्रत्यक्षात नाही तर त्यांच्या पुतळे बनवून लग्न लावले

गणेशच्या एका नातेवाईकाने सांगितले की, गणेश आणि रंजनाचा पुतळा बनवून आदिवासी परंपरेनुसार त्या दोघांचा विवाह पार पडला. पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली आणि त्यानंतर विवाहसोहळा पार पडला. यावेळी परिसरातील अनेकजण या सोहळ्यात सामील झाले आणि त्या दोघांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.

दोघांच्या मृत आत्म्याला शांती मिळावी यासाठी कुटुंबियांनी त्यांचे पुतळे बनवले. दोघेही जिवंत असताना कुटुंबियांनी त्यांचे लग्न लावून दिले नाही. त्यांच्या मृत्यूनंतर आत्म्याला शांती मिळावी या भावनेतून कुटुंबियांनी लग्न लावून दिल्याचे समजते.

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.