सुसरी येथील दोन शेत मजुर महिला विज पडून ठार…

0

 

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

भुसावळ तालुक्यातील सुसरी येथील दोन महिलांच्या अंगावर विल्हाळे शिवारात शेतात काम करत असताना विज पडून ठार झाल्याची घटना दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली.

या बाबत वृत असे की, तालुक्यातील सुसरी गावातील शेतकरी तुकाराम शांताराम तळेले यांच्या विल्हाळे शिवारातील शेतात कामासाठी मिनाक्षी उर्फ मनिषा रविंद्र तळेले (३४), ममता विनोद पाटील (३३) हे मंगळवार दि २६ रोजी काम करत असताना दुपारी एक वाजेच्या सुमारास अचानक दोघ महिलांच्या अंगावर पडल्याने त्या जागीच बेशुद्ध पडल्या. हि घटना शेजरच्या शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याच्या लक्षात येताच त्यांनी सुसरी गावात संपर्क साधुन बेशुद्ध अवस्थेत महिलाना वरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून मृत घोषित केले.

मयत मिनाक्षी तळेले यांच्या यांच्या पश्च्यात पती, एक मुलगा, एक मूलगी असा परिवार आहे. तर  ममता पाटील यांच्या पश्च्यात पती व दोन मुल असा परिवार आहे. या बाबत वरणगाव पोलीस स्टेशनला नितिन पुडलीक पाटील पो पाटील (सुसरी) यांच्या खबरी वरून अकस्मत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे सुसरी गावात शोककळा पसरली असून, घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.