जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:
रावेर येथील महिला आपल्या माहेरी वरणगाव येथे परिवारासह धार्मिक कार्यक्रमासाठी गेल्या असता त्यांचा अचानक मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, रावेर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील रहिवासी नम्रता दिनेश चौधरी (वय-३९) परिवारासहित वरणगाव येथे गेल्या होत्या. दुपारी कार्यक्रम आटपून वरणगांव येथिल माहेरात गेल्या मात्र घरी पोहोचताच त्यांना अत्यावस्त वाटू लागले. आणि त्यांना उलटी देखील झाली त्यानंतर त्यांना तातडीने दवाखान्यात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. उष्माघाताने मृत्यू झाला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्या केबल नेटवर्कचा व्यवसाय असलेल्या दिनेश नत्थू चौधरी यांच्या पत्नी होत.