खासदार उन्मेश पाटील यांच्या प्रयत्नांतून अमरावती सातारा रेल्वेला प्रारंभ

0

चाळीसगाव ;- एकमेव महाराष्ट्र एक्सप्रेस नंतर पुणे जाणाऱ्या प्रवाशांना दुसरी गाडी नसल्यामुळे मोठी गैरसोयीचा सामना करावा लागत होता. सात्यत्याने याबाबत प्रवाश्यानी खासदार उन्मेशदादा पाटील यांना भेटून नविन गाडी सुरु करावी अशी मागणी केली होती. याबाबत खासदार उन्मेश  पाटील यांनी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव , राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांना भेटून निवेदन दिले होते.

 

या अनुषंगाने पुणे जाण्याऱ्या विदयार्थी, पालंकासाठी अडचण दुर झाली असून अमरावती सातारा दरम्यान 01155 ही विशेष गाडी सुरू करण्यात आली आहे. या गाडी मुळे एकमेव महाराष्ट्र एक्सप्रेस नंतर पुणे जाणाऱ्या प्रवाशांना दुसरी गाडी मुळे दिलासा मिळाला असून जेजुरी जाण्याऱ्या भाविकांना या गाडी मुळे मोठी सोय झाली आहे.

 

याबाबत सविस्तर माहिती अशी अमरावती- सातारा अनारक्षित ही विशेष गाडी क्रमांक 01155 सुरू झाली आहे. सातारा येथून ही विशेष गाडी क्रमांक 01156 ही 28 जानेवारीस सातारा येथून साडेचारला सुटेल. अमरावती येथे दुसऱ्या दिवशी अकरा वाजता पोहोचेल. ही गाडी बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड,कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौड कॉर्ड लाइन, पुणे, जेजुरी, लोणंद आणि सातारा या स्थानकावर थांबेल. या गाडीत सर्व १४ डबे सामान्य द्वितीय श्रेणीचे असून प्रवाश्यांनी या गाडीचा अधिकाधिक लाभ घ्यावा असे रेल्वे प्रशासनाने केले आहे.

पुणे जाण्यासाठी नविन गाडी

जळगाव, पाचोरा तसेच चाळीसगाव येथून पुणे येण्यासाठी जाण्यासाठी महाराष्ट्र एक्सप्रेस शिवाय दुसरी गाडी नसल्यानें विद्यार्थ्यासह पालकांचे हाल होत होते. पुणे येण्यासाठी जाण्यासाठी नविन गाडी सुरु करावी अशी मागणी खासदार उन्मेशदादा पाटील यांचेकडे सात्यत्याने केली होती.यासाठी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी पाठपुरावा केला होता.त्यामूळे ही गाडी पुणे जाण्यासाठी सुरु करण्यात आली आहे. या नविन गाडीमुळे नवविवाहितांसह भाविकांना जेजुरी जाण्यासाठी फायद्याची ठरली आहे. ही गाडी शेगाव व जेजुरी या दोन तीर्थस्थळ, शैक्षणिक हब पुणे जोडणारी असल्याने भाविकांसह पालकांनी खासदार उन्मेशदादा पाटील यांचे आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.