जळगाव /नवी दिल्ल्ली ;- भाजपाचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे खासदार उन्मेष पाटील यांनी आज दुपारी ११. ५० वाजता आपल्या खासदारकीचा राजीनामा लोकसभाध्यक्ष ओम जी. बिर्ला यांच्याकडे पाठविला आहे. . खा. उन्मेष पाटील यांना भाजपने उमेदवारी नाकारल्याने ते नाराज असल्याने गेल्या अनेक दिवसांपासून ते भाजपच्या बैठकांकडे उपस्थित राहिले नाही .
ते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्यांच्या सातत्याने संपर्कात असल्याने त्यांच्या पक्ष प्रवेशाच्या चर्चाना उधाण आले होते . त्याच पार्श्वभूमीवर खा. पाटील यांनी काल पारोळ्याचे नगराध्यक्ष करणं पवार यांच्यासह उबाठा गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत ,नेते खासदार संजय राऊत आणि पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून उबाठा मध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाल्याने आज खा. उन्मेष पाटील यांनी आपला राजीनामा लोकसभा अध्यक्ष ओम जी. बिर्ला यांच्याकडे पाठविला आहे.
त्यामुळे त्यांचा उबाठा गटात प्रवेश निश्चित मानला जात आहे. मात्र त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे मात्र जालगाव जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.