आता राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास महागणार ! प्रवाशांना ‘इतके’ पैसे मोजावे लागणार

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

दिवसेंदिवस महागाई वाढत असल्याने सर्वसामान्यांना त्याची मोठी झळ बसत आहे. त्यातच आता प्रवास देखील महागणार आहे. कारण भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHI) 1 एप्रिलपासून म्हणजेच आज रात्री 12 वाजता टोल टॅक्स (Toll Tax) मध्ये 10 ते 65 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

राष्ट्रीय महामार्गावर धावणाऱ्या छोट्या वाहनांच्या टोलमध्ये 10 ते 15 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे, तर व्यावसायिक वाहनांच्या टोलमध्ये 65 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे जर तुम्ही राष्ट्रीय महामार्गावरून रोज प्रवास करत असाल तर आता तुम्हाला तुमचे टोल बजेट थोडे वाढवावे लागणार आहे.

10 ते 15 टक्क्यांची वाढ

सराय काले खां ते काशी टोल प्लाझा पर्यंत जिथे आधी कार आणि जीपसाठी 140 रुपये मोजावे लागत होते. आता त्यासाठी 155 रुपये मोजावे लागतील. रसुलपूर सिक्रोड प्लाझा येथील सराई काळे खा येथूनच आता वाहनचालकांना 100 रुपये मोजावे लागणार आहेत, तर भोजपूरसाठी 130 रुपये मोजावे लागणार आहेत. अनेक प्रकारच्या वाहनांसाठी येथे टोल टॅक्स 10-15 टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे.

दरम्यान, लखनौला जोडणाऱ्या सध्याच्या 6 राष्ट्रीय महामार्गांमध्ये हरदोई महामार्गावर सध्या कोणताही टोलनाका नाही, तर सीतापूरमध्ये ऑक्टोबरपासून बदललेले टोल दर लागू होणार आहेत. या दोघांशिवाय कानपूर, अयोध्या, रायबरेली आणि सुलतानपूरला जायचे असेल तर आज रात्रीपासून लोकांना वाढीव दराने टोल टॅक्स भरावा लागणार आहे. लखनौ रायबरेली महामार्गावर आता छोट्या वाहनांसाठी 105 रुपये मोजावे लागणार आहेत, तर बस-ट्रकसाठी 360 रुपये मोजावे लागणार आहेत.

लखनौहून अयोध्येकडे जाणाऱ्या वाहनांना आता छोट्या खासगी वाहनांसाठी 110 रुपये मोजावे लागतील, तर ट्रक किंवा बससाठी 365 रुपये मोजावे लागतील. लखनौ-कानपूर महामार्गावरील नवाबगंज प्लाझा देखील महाग झाला असून, यामध्ये छोट्या वाहनांना 90 रुपये आणि व्यावसायिक वाहनांना 295 रुपये टोल द्यावा लागणार आहे. त्याच धर्तीवर लखनौ ते सुलतानपूर महामार्गावर आता छोट्या वाहनांसाठी 95 रुपये आणि डबल एक्सल वाहनांसाठी 325 रुपये मोजावे लागणार आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.