जिल्ह्यात थंडीचा जोर वाढणार !

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जिल्ह्यात सोमवारी (दि. १८) मध्यरात्री पासून उत्तरेकडील थंडगार वाऱ्याचा वेग वाढला आहे. यामुळे तापमानाचा पारा १२.५ अंशांपर्यंत खाली आला आहे. थंडीची ही लाट २५ डिसेंबरपर्यंत कायम राहील, असे हवामान अभ्यासक वेलनेस वेदरचे संचालक निलेश गोरे यांनी सांगितले.

जिल्ह्यात काही दिवसांपासून तापमान कमी झाल्याने थंडी सुरू झाली होती; पण ती इतकी बोचरी नव्हती, किंबहुना यंदा थंडीचा फार जोर नाही, असाच सर्वत्र सूर होता. सोमवारी मध्यरात्रीपासून शहरासह जिल्ह्यात थंडी वाढली आहे.

उत्तरेकडून अतिथंड वारे महाराष्ट्रात वाहू लागले. या वाऱ्यांचा वेग प्रतितास १८ असा आहे. जळगाव जिल्ह्यात आजचे किमान तापमान १२.५ तर कलाम तापमान २६ अंश नोंदवले आहे. सोमवारचे किमान तापमान १४ अंश होते. आगामी २५ डिसेंबरपर्यंत किमान तापमान १० ते १३ अंशांदरम्यान राहील, असे सांगण्यात आले. कमल तापमान २४ ते २६ डिग्रीदरम्यान असेल.

Leave A Reply

Your email address will not be published.