राज्य शासनाचा अध्यादेश; उद्या सकाळी ११ वाजता समूह राष्ट्रगीत गायन…

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क;

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने राज्य शासनाने एक अध्यादेश काढला आहे. उद्या म्हणजे 17 ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता समूह राष्ट्रगीत गायन केलं जाणार आहेत. नागरिकांनी आहे त्याच ठिकाणी थांबून राष्ट्रगीत गायन करण्याचं आवाहन राज्य सरकारने केलं आहे.

राज्य सरकारने याबाबत एक अध्यादेश काढला आहे. मोठ्या संख्येने नागरिकांनी यात सहभागी व्हावं असं आवाहन राज्यसरकारतर्फे यावेळी करण्यात आलं आहे.

राज्यातील खासगी, शासकीय तसंच इतर सर्व शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था विद्यापीठांमधील शिक्षक विद्यार्थी सहभाग असणार आहे. तसंच खासगी आस्थापना, व्यापारी प्रतिष्ठाने, संस्था यांनी सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन देखील शासनामार्फत करण्यात आलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.