डोंबिवली, लोकशाही न्यूज नेटवर्क
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार श्रीकांत शिंदे कल्याण लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या विविध घटक पक्षांच्या मेळावे घेत आहेत. महायुतीच्या मेळाव्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहॆ.
श्रीकांत शिंदे म्हणाले की बाळासाहेबांचे विचार विकण्याचे काम राहिलेल्या शिल्लक सेनेने केले. त्यांच्या प्रमुखांनी केले. आज त्यांना जे अनेक वर्ष पाहिजे होते, ते त्यांनी त्या ठिकाणी केले त्यांना पहिल्यापासून काँग्रेस बरोबर जायचे होते. काँग्रेस सावरकरांना मानत नाही, सावरकरांना रोज शिव्या देतात. उद्धव ठाकरे त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात… जे हिंदुत्वाला विसरले जे बाळासाहेबांच्या विचार विसरले त्यांच्याकडून दुसरे काय अपेक्षा आहे? असा सवाल त्यांनी विचारला. आम्हाला अभिमान आहे, आम्ही हिंदुत्वाबरोबर उभे राहिलो, आम्ही बाळासाहेबांच्या विचाराबरोबर उभे राहिलो. आम्ही सावरकरांच्या विचारांबाबत उभा राहिलो. म्हणून धनुष्यबाण आणि शिवसेना एकच आहे. सामान्य शिवसैनिकाच्या हातामध्ये पूर्णपणे सुरक्षित आहे, असेही श्रीकांत शिंदे म्हणाले.
डोंबिवली मनसेचा शिंदेसाठी मेळावा
डोंबिवलीमध्ये एक तारखेला मनसेचा मेळावा होणार आहे. या मेळाव्याला मी उपस्थित राहणार, राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला. राज ठाकरेंच्या यांच्या येण्यामुळे महायुतीची ताकद अजून वाढली आहे. तर राज ठाकरेंची सभा कल्याण लोकसभा मतदारसंघात झाली तर आम्हाला आनंदच असल्याचे श्रीकांत शिंदे यांनी सांगितले आहे.