जनतेने निवडणूक हातात घेतल्याने श्रीराम पाटील यांचा विजय निश्चित

रावेरच्या मेळाव्यात आमदार शिरीष चौधरी यांनी व्यक्त केला विश्वास 

0

 

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

केंद्रातील सरकारने सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लाक्ष केल्याने या सरकारच्या कारभाराला जनता वैतागली आहे. आता जनतेला बदल हवा असून हे सरकार उलथवून टाकण्यासाठी हि निवडणूक जनतेने हातात घेतली आहे. रावेर मतदार संघात श्रीराम पाटील यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास आमदार शिरीष चौधरी यांनी व्यत्क्त केला. रावेर लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडी व मित्र पक्षांच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे येथे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी आमदार शिरीष चौधरी होते.

यावेळी व्यासपीठावर माजी आमदार अरुण पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे,  काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, रावेर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार श्रीराम पाटील, राष्ट्रवादी किसान जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, रावेर लोकसभा क्षेत्र प्रमुख अतुल पाटील, प्रभाकर सोनवणे, माजी नगराध्यक्ष दारा मोहम्मद, माजी नगराध्यक्ष हरीश गणवाणी, शिवसेनेचे (उबाठा गट) प्रल्हाद महाजन, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख योगीराज पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ राजेंद्र पाटील, राष्ट्रवादीचे शरद पवार गट तालुकाध्यक्ष किशोर पाटील, मुरलीधर तायडे, राजीव पाटील, युवानेते धनंजय चौधरी,    योगेश पाटील,मंदार पाटील,सैय्यद असगर, ज्ञानेश्वर कोळी, जमील शेख, रवींद्र पवार, कांता बोरा, राजू सवर्णे, योगेश गजरे, सुनील कोंडे, प्रशांत बोरकर यांच्यासह महाविकास आघाडीचे असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित कार्यकर्त्यांनी प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार केला. प्रास्तविक तालुकाध्यक्ष किशोर पाटील यांनी केले तर सूत्रसंचलन दीपक पाटील यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.