शिवसेना संपवण्यासाठीच विरोधकांचा खटाटोप – उद्धव ठाकरेंचे आरोप…

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क:

आपल्याला छळून (Tortured) मनस्ताप (heartache ) देत शिवसेना संपवण्यासाठीच विरोधकांचा खटाटोप आहे.( The opposition is bent on ending the Shiv Sena) आपल्याला अडवण्याचे बरेच प्रयत्न झाले तरीही मशाल घेऊन पुढे जाऊया. अंधेरी निवडणुकीत जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न केला, असा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray) यांनी आज केला.

उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी बुलढाण्यातील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज मातोश्रीवर आले होते. त्यांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले आहे. ते म्हणाले, माझ्या बाजूला राजन साळवी उभे आहेत. राजन साळवींनाही अनेक प्रलोभने दिली गेली. पण हा माणूस डगमडला नाही. नुसताच डगमगला नाही तर रत्नागिरी जिल्ह्यात आज ते गद्दारांना गाडून त्यांच्या छाताडावर उभे आहेत.

ठाकरे म्हणाले, धनुष्यबाण गोठवले तरी हातातली मशाल घेऊन तुम्ही पुढे जात आहात. प्रत्येक चिन्हाचे एक महत्त्व असते. रामाने धनुष्यबाणानेच रावणाला मारले होते. तर अन्याय जाळणारी आणि अंधारात वाट दाखवणारी मशाल असते. निवडणूक आयोगाने काही काळापुरता हा आदेश दिला आहे.नंतर आपलं नाव आणि चिन्ह वगैरे परत मिळणारच आहे.

मी आधीच जाहीर केले की, दसरा मेळाव्यानंतर महाराष्ट्र दौरा करेल. आता लवकरच राज्याचा मी दौर्यावर जाणार आहे. आपल्याला अडवण्याचे बरेच प्रयत्न झाले आहेत. अडवण्याचा प्रयत्न झाले तरीही मशाल घेऊन पुढे जाऊयात. तुम्ही मशाल घेऊन पुढे जात आहात याचा मला अभिमान आहे, आपली मशाल अन्यायाला जाळणारी, अंधारात वाट दाखवणारी आहे. फक्त आपल्याला मनस्ताप द्यायचा, आपल्याला छळायचं आणि शिवसेना संपवायची यासाठी हे सगळं केलं गेलं! असेही ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.