संजय राऊतांविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार; काय आहे प्रकरण ?

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

संजय राऊत नेहमी त्यांच्या वक्तव्यामुळे अडचणीत सापडतात. त्यातच आता आणखी एक विधान त्यांना अडचणीत टाकणारं ठरत आहे. उद्धव ठाकरेंनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची तुलना औरंगजेबाशी केली होती. शिवाय संजय राऊत हे देखील असंच बोलले होते. त्यामुळे त्यांच्याविरोधात निवडणूक आयोगामध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली आहे.

संजय राऊत यांच्याविरोधात भोईवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेली असून निवडणूक आयोगाकडेही तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना औरंगजेबाशी करुन समाजातील मोठ्या वर्गाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आलेला आहे.

भाजपचे सचिव विवेकानंद गुप्ता यांनी संजय राऊत यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी संजय राऊतांना नोटीस येऊ शकते आणि त्यांची चौकशीदेखील होऊ शकते. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांनीही मोदी-शाह यांच्याबाबत असंच विधान केलेलं आहे.

बुधवारी सिंदखेड राजा येथे आयोजित कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरेंनी चौफेर टीकास्र सोडलं होतं. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत, परंतु त्यांना केवळ गुजरातबद्दल प्रेम आहे. एकामागून एक प्रकल्प गुजरातला नेल्याचा उद्धव ठाकरेंनी आरोप केला. ”छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म महाराष्ट्रात झाला. पण औरंगजेबाचा जन्म गुजरातमधील दाहोत येथे झाला. त्यामुळेच मोदी-शाह यांच्यात औरंगजेबी वृत्ती आहे.. त्यांना महाराष्ट्र लुटायचा आहे आणि मराठी माणूस संपवायचा आहे.” असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला होता.

 

Leave A Reply

Your email address will not be published.