रेल्वेखाली झोकून देत जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्याने संपवले जीवन

0

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

अमळनेर शहरातील रहिवासी तसेच जळगाव जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्याने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना दि ६ नोव्हेंबर रोजी ८. ३० च्या सुमारास चोपडा रेल्वे गेटजवळ घडली. नितीन अरविंद पाटील (वय ५०) असे मयत कर्मचाऱ्याचे नाव आहे.

सविस्तर माहिती अशी की, जळगाव जिल्हा परिषदेत नितीन अरविंद पाटील हे कार्यरत होते. ते जळगाव शहरात परिवासासोबत वास्तव्यास होते. त्यांची आई अमळनेर येथील समर्थनगर येथे वास्तव्यास आहे. दि. ६ रोजीच्या रात्री ८.३० च्या सुमारास चोपडा रेल्वे गेटजवळ रेल्वेखाली झोकून देत त्यांनी आपले जीवन संपवले. हा प्रकार तेथील गार्डच्या लक्षात आल्याने जवळ जाऊन पहिले असता, त्यांच्या खिशात असलेल्या ओळखपत्रावरून त्यांची ओळख पटली. अमळनेर ग्रामीण रुग्णालयात त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले असून, तेथेच त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले. मानसिक तणावाखाली वावरत असल्यामुळेच त्यांनी हे पाऊल उचलले असावे अशी चर्चा सर्वत्र होती. याबाबत अमळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. त्याच्या पश्चात पत्नी, आई, मुले असा परिवार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.